कशाला जगाचे पोशिंदे होताय…

  कशाला जगाचे पोशिंदे होताय… #selflove #farmer #life

*4 एकर कांदा 5 रुपये किलोने विकण्यापेक्षा फक्त 1 चं एकर कांदा लावा आणि 100 रुपये किलोने विका !!.


*भाज्या 20 गूंठे ऐवजी 5 गूंठेचं लावा !!


*4 ऐकर जमीन असेलं तर 2 ऐकरवरंच पेरणी करा !!


*2 ऐकर जमीन वर्षभर जमीन पडीक ठेवा,खर्च कमी होईलं !!


*2 ऐकर पेरणीमुळे उत्पादन कमी झाले तरी भाव मिळेल,भाव मिळाला की तुमचे उतपन्न ही वाढेलं !!


*2 ऐकर पडीक ठेवलेल्या जमीनीचा पोतही वाढेलं,पुढचे पीक भरभरून येईलं !!


*वारंवार वर्षभर पिके घेवून,रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होते आहे,जमीनीचा पोत बिघडतो आहे,उत्पादन क्षमता कमी होतं आहे !!.



*जास्त लागवड करून स्वतःच स्वतःची अडचण करून घेतातं शेतकरी !!.


*बळीराजा,जगाचा पोशींदा या तुमच्या अंगावर घातलेल्या रंगीबेरंगी झूली आहेतं,त्या झूली काढून फेकून द्या,विहीरीत बुडवून टाका,नाहीतर जाळून टाका !!

*खालील बाबी का होताहैतं याचाही शांत चित्ताने विचार करा !!


( 1 ) शहरी वर्ग तुमचेचं पिकवलेले  स्वस्त: खावून तुमच्यावरचं डोळे वटारतोयं.

( 2 ) बियाणे कंपन्या मोठ्या होतायतं.

( 3 ) रासायनिक खतांच्या कंपन्या मोठ्या होतायतं,

औषध कंपन्या मोठ्या होतायतं.

( 4 ) व्यापारी मोठे होतायतं.

( 5 ) कारखानदार मोठे होतायतं.

( 6 ) अगदी शेतमजूर देखील सुखाने जगत आहेतं.

( 7 ) पण शेतमालक शेतकरी मात्र भिकेला लागलायं !!.


*वरील सर्व लोकं तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवून एकांतात फिदीफिदी हसणारी लोकं आहेतं,म्हणून यांचा नाद सोडा !!


*प्रथम आपल्या कुटुंबाला लागणारे वाण जसं भात,तेल,डाळी,भाज्या,कडधान्य,भुईमूग,साखरे ऐवजी गुळ ईत्यादी रोजच्या गरजांची पूर्तता करून स्वंयपूर्ण होवून सम्रृद्ध व्हा !!


*थोडा वेळ लागेलं,खुप तर खुप 5 वर्षे लागतीलं !!


*पण तुम्ही यातून या मुजोर व्यवस्थेने निर्माण केलेल्या आभासी परिस्थितीवर नक्कीचं मात करू शकता !!


*तुमच्याकडे असलेल्या जमीनीपैकी 50% जमीनचं दरवर्षी पेरायची हा निर्णय भारतभर चे शेतकरी लोकांनी ऐकजुटीने घ्या,तुमच्या जीवनात येणारा बदल बघा,आनंदी व्हा !!


*हा बदल करायची वेळ आलेली आहे,50% जमीनचं पेरायची वेळ आलेली आहे !!


*कारण तुम्ही आत्महत्या केली तरी वरील लोकांना तुमची,तुमच्या परिवाराची काळजी,चिंता नाहीये मग तुम्ही कशाला त्यांचे पोशींदे होतायं ??

Comments

Popular posts from this blog

Swami samarth Aakalkot

गुरुचरित्र अध्याय 14 वा मराठी | Gurucharitra Adhyay 14 Marathi

पालखी पंढरपूरला जाते त्या गावांची नावे अत्यंत अर्थपूर्ण आहेत.