पालखी पंढरपूरला जाते त्या गावांची नावे अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.

आळंदी -  पालखी आळंदीतून  निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 


पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.) 


दिवेघाट -  नंतर पालखी  संवत्सर ग्राम उर्फ सासवड  या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी  या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. https://youtube.com/shorts/YR5-QcNVT1k?feature=share


सासवड -  वड म्हणजे " सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र" या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे  सासवडचा  मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन  सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे.


जेजुरी -  नंतर पालखी जेजुरीला येते. "ज = जितेंद्र ,"

"जोरी = जास्त त्रास न घेणे."

म्हणजेच "जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो." 


 वाल्ह्या -  भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने "वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न" झाले पाहिजे. "(वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)" 


लोणंद - त्यानंतर पालखी  लोणंदला मुक्कामाला येते. "लो = देणे, आनंद = परमसुख." श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 


तरडगाव - जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल* या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी  तर + रड =तरडगावला  येते. 


फलटण - ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर


 बरड -  संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे " बरड " जमिनीसारखे होते. 


 नातेपुते - नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त "श्रीविठ्ठलाचा" होतो.


 माळशिरस -  माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस.  पायी चालल्याने  शारीरिक  मुखाने नामस्मरण केल्याने  वाचिक  विठ्ठलध्यासाने मानसिक  तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या  श्रवणाने  ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 


वेळापूर - त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते.  


 वाखरी -  वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी " प्रासादिक व वाचासिद्ध " होऊन.


 नंतर तो पंढरपूर* जाऊन " पांडुरंगमय " होतो.




Comments